‘देशात लॉकडाऊनची गरज आहे की, नाही याचा निर्णय पंतप्रधान घेतील. पण काल मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी लॉकडाऊनची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसं संकेत त्यांनी दिले आहेत,’ असं संजय राऊत म्हणाले आहेत.
‘सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लॉकडाऊन लागू करावा लागेल का याचा विचार व्हायला पाहिजे. पश्चिम बंगालाच्या निवडणुकीमुळं सध्या केंद्र सरकार स्वार्थ पाहत आहे. आज पश्चिम बंगालमध्ये शक्तीप्रदर्शन सुरु आहे. पण मला वाटतं पश्चिम बंगालच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर याविषयी केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतो,’ असं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको अशी भूमिका मांडली आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘लोकांना लॉकडाऊन नको असं फडणवीसांनी सांगितलं. हे अगदी योग्य आहे. मात्र, ही गोष्ट सरकारलाही माहिती आहे. मग लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, जर मोदींनी देशात पुन्हा लॉकडाऊन केला तर देवेंद्र फडणवीस म्हणतील का महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा. अशा परिस्थीतीत राजकारण करणं कोणालाही शोभत नाही,’ असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times