विभागीय आयुक्त राव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या मागण्यांचा पुनरुच्चार करून भूमिका मांडली.
बापट म्हणाले ’लॉकडाउनमुळे अर्थचक हे उलटे फिरणार आहे. कामगार हे पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. हातावर पोट असणाऱ्या आणि कंपनीत कामाला जाणाऱ्याचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे लॉकडाउनची आवश्यकता नाही. यामध्ये राजकारण आणत नाही. लोकांचा विचार करून ‘पीएमपी’च्या बसेस या सुरू करण्यात याव्या. नागरिक हे शिस्त पाळत नसतील, तर त्यांना कठोर शिक्षा करा. घोळक्याने थांबणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. मात्र, लागू करू नये’
केंद्र आणि राज्य असा भेदभाव करत नसल्याचे सांगून बापट म्हणाले, ‘केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या संपर्कात आहे. आज, सोमवारी एक लाख ६० हजार लशींचा साठा आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. राज्य सरकारने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिला पाहिजे. रुग्णालयांनी गरजेनुसार रुग्णांना रेमडेसिव्हिर द्यावे. सरकार काही खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर देण्याचा विचार करीत आहे.’
क्लिक करा आणि वाचा-
केंद्र सरकारकडून नादुरुस्त व्हेंटिलेटर आल्याबाबत ते म्हणाले, ‘व्हेंटिलेटर हे दुरुस्त करावे लागतात. त्याचे सर्व्हिसिंग करावे लागते’
‘सरकार काम करत आहे. मात्र, समाज एकवटून काम करीत नसल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवी संस्था दिसत नाहीत’ असेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘रायगड जिल्ह्यातील जिंदाल कंपनीची ७५० टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे. तेथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन मागविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे ३५० टन ऑक्सिजनची गरज असून, सध्या ३८५ टन साठा आहे’ असे त्यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
‘आरोग्य यंत्रणा कोलमडलेली नसून, संख्या वाढत चालल्यामुळे ताण पडत आहे. मात्र, अधिक चांगली सेवा देण्याची गरज आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करावे आणि विनाकारण घराबाहेर फिरू नये‘ असे आवाहन बापट यांनी केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times