मुंबईः विरोधी पक्षाचे नेते यांनी पंढरपुर येथील सभेत मी सरकारचा पूर्ण कार्यक्रम करतो, असं सूचक वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर शिवसेनेचे खासदार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्यासाठी फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. या प्रचारसभेत त्यांनी ‘सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरुनच संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना आमच्या कायम शुभेच्छा आहेत, असं म्हणतानाच राऊतांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच, ‘देवेंद्र फडणवीस हे आमचे वैयक्तिक शत्रू नाहीयेत, राजकारणात वैचारिक लढाई असते ती आम्ही निवडणुकीत लढू,’ असंही स्पष्ट केलं आहे. ‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जी तारिख निवडली असेल त्यालाही आमच्या शुभेच्छा’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

देशात लॉकडाऊनची गरज

‘लॉकडाऊनबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री निर्णय घेतली. पण महाराष्ट्रातच नाही तर देशातही अशा प्रकारचा निर्णय लावला तर आश्चर्य वाटणार नाही. कुंभमेळ्यात व पश्चिम बंगालमध्ये गर्दी झाली होती. कुंभमेळ्यात लाखो लोकं एकत्र आले होते. पण, त्या तुलनेत महाराष्ट्रात स्थिती नियंत्रणात आहे. लोकं नियम पाळतायेत. लोकांनी स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे,’ असं राऊत म्हणाले आहेत.

‘महाराष्ट्र सरकार, प्रशासन, आरोग्यव्यवस्था देशातील सर्वोत्तम आहे. आम्ही सगळे मुख्यंत्र्यांच्या नेतृत्वात ही लढाई लढत आहोत. रुग्णसंख्या वाढत असली तरी संपूर्ण देशाचा विचार करा. हरिद्वारमध्ये काय झालं लाखो लोक एकत्र आले. त्यावर नियंत्रण ठेवायला हवं होतं. राज्यात गुढीपाडवा साजरा करण्यावर मुख्यमत्र्यांनी नियंत्रण आणलं. लोकांना आवडत नसलं तरी पण सरकारने केलं आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्रात इतर राज्यांमधून लोक येत असून तिथे नियंत्रण नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे.

दरम्यान, ‘संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरही भाष्य केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये महायुद्ध सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये कोण शिखंडी आहे ज्यांच्याआडून हे युद्ध सुरु आहे हे पाहावं लागेल. ममता बँनर्जींवर लागलेली बंदीमुळं लोकशाही व निवडणुक आयोगावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय. पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे उल्लंघन फक्त ममता बँनर्जींच्या पक्षानंच केलंय का? बंगालमध्ये कोणतेही पक्ष नियमांचे पालन करत नाहीत मग ममता बँनर्जी यांच्यावरच बंदी का?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. तसंच, पश्चिम बंगालमधील निवडणूक ममता बँनर्जीच जिंकणार,’ असा दावाही त्यांनी केलाय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here