आज राज्यात एकूण २७८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २८१ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २९ लाख ०५ हजार ७२१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आले आहे.
क्लिक करा आणि पाहा-
राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाखांवर
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख १२ हजार ०७० इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १२ हजार २१३ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८६ हजार ६३५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ८४ हजार ०९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६५ हजार ३६८ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४४ हजार ८८० इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये १७ हजार ९३७ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ६८०, तसेच नांदेडमध्ये ही संख्या १३ हजार ९१७ इतकी आहे. जळगावमध्ये १२ हजार १२६, तर रायगडमध्ये एकूण १० हजार ४१४ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ३ हजार ९८०, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ४५४ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ५८५ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
३४,५५,२०६ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी २८ लाख ०२ हजार २०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३५ लाख ७८ हजार १६० (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४ लाख ५५ हजार २०६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २८ हजार ४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times