‘रेमडेसिवीरचे जे निर्यातदार आहेत. ज्यांच्यावर बंदी आहे. हे निर्यातदार जर त्यांचा माल आपल्याला देऊ शकले किंवा सात कंपन्यांच्या मार्फत देखील देऊ शकले. तरी देखील आपल्या राज्याच्या तातडीच्या दृष्टीने उपयुक्त ठरु शकते,’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
‘केंद्र शासनाने ज्या कंपन्यांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे त्या कंपन्यांनी जर आपल्या राज्य शासनाला निर्यातीसाठी तयार केलेला रेमडेसिवीरचा जो साठा आहे, तो दिला तर या पाच- सात दिवसात आपली जी काही कमतरता आहे ती दूर होईल,’ असंही टोपे यांनी म्हटलं आहे.
‘१५ कंपन्यांना निर्यात बंदी केली आहे, त्यांच्याकडे माल तयार आहे. केवळ निर्यात बंदी केलेला माल आपल्याला मिळू शकेल का? यासाठीचा प्रयत्न केला जात आहे. ते जर कायदेशीरदृष्टीने यशस्वी झालं तर काही अडचण राहणार नाही,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times