नवी दिल्लीः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. दुसरीकडे राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ( ) यांनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उर्वरीत सर्व टप्प्यांसाठी एकाच वेळी मतदान घ्यावं, अशी मागणी ममतांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता निवडणूक आयोगाने उद्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीच्या उर्वरीत टप्प्यांबाबत सर्व राजकीय पक्षांकडून त्यांचे मत जाणून घेतले जाईल. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ४ टप्प्यांचं मतदान झालं आहे. चौथ्या टप्प्यात हिंसाचार झाला होता. यात ५ जणांचा मृत्यू झाला होता. तृणमूल काँग्रेसने यावरून निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलांवर आरोप केला होता.

भाजप प्रदेशाध्यक्षांवर प्रचारबंदी

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची बंदी घातली आहे. दिलीप घोष यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचं आयोगाने म्हटलं आहे. घोष यांच्यावर आज संध्याकाळी ७ वाजेपासून उद्या १६ एप्रिल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही प्रचारबंदी लागू असेल. याशिवाय निवडणूक आयोगाने भाजप नेते सयंतनू बासू यांना नोटीस बजावली आहे. उत्तर २४ परगनामधील एका सभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. आयोगाने उत्तरासाठी २४ तासांचा वेळ दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here