वाचा:
पंढरपुरात दोन्ही पक्षांची ताकद पणाला लागली असल्याने येथील प्रचारातही एकमेकांवर बरेच तोंडसुख घेण्यात आले. तरीही ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी सोपी नसून येथे अतिशय अटीतटीची लढाई होईल, असे स्पष्ट चित्र दिसत आहे. अजित पवार यांनी मतदारसंघात सभा गाजवल्या. त्यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले. त्यावर पलटवारही झाले. अजित पवार यांनी केलेल्या टीकेला गुरुवारी चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत जास्त गमजा करू नका असा इशारा पाटील यांनी दिला. त्यावर मंगळवेढ्याच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी प्रतिवार केला. चंद्रकांत पाटील आणि हे शेतकरी वाटतात का, असा सवाल करत त्यांना डिवचले. दुसरीकडे मंगळवेढ्याच्या सभेला येण्यापूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट जतपर्यंत फिरून मंगळवेढ्याला कसे पाणी देता येईल याचा अभ्यास केला व भाषणात पाणी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले. मतदारांना भुलवयाचा असा प्रयत्न दोन्ही बाजूने झाला असला तरी वर्षानुवर्षे पाण्यासाठी तडफडणारी जनता मते कोणाला देणार याचे उत्तर मतदानातूनच मिळणार आहे. १७ एप्रिल रोजी येथे मतदान होत आहे.
वाचा:
या निवडणुकीत राष्ट्रवादीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांचा मोठा फटका बसणार असे दिसत आहे. यासोबत वंचित बहुजन आघाडी व इतर काही छोट्या पक्षांकडूनही राष्ट्रवादी विरोधी सूर आहे. भाजपचे उमेदवार याना त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांचा मोठ्या प्रमाणात फटका मंगळवेढ्यात बसणार असून ही मते थेट समाधान अवताडे यांच्या पारड्यातून वजा होतील असे दिसत आहे. या सर्व साठमारीत राष्ट्रवादीचे उमेदवार यांना वडिलांच्या निधनाची सहानुभूती मिळणार असेही चित्र आहे. या निवडणूक प्रचारासाठी अजित पवार चक्क चार दिवस मतदारसंघात तळ ठोकून होते. निवडणुकीची सर्व सूत्रे अजित पवार आणि जयंत पाटील यांचेकडे होती. बारामती या आपल्या मतदारसंघात अजित पवार केवळ एक शेवटची सभा घेतात मात्र तेच अजित पवार या निवडणुकीत गावोगावी जात नेत्यांच्या गाठीभेटी घेताना दिसले. अनेक नेत्यांना राष्ट्रवादीत आणून त्यांनी भगीरथ भालके यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या बाजूने धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे यांनी राष्ट्रवादीला जेरीस आणण्यासाठी जोरदार प्रचार केला. त्यामुळे आता अजित पवार व जयंत पाटील यांनी उभी केलेली ताकद सरस ठरणार की देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी उभी केलेली ताकद सरस ठरणार हे २ मे रोजी निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times