वाचा:
संचारबंदी सुरू झाल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. मात्र, विविध कारणे सांगत वाहनधारक मात्र रस्त्यावर फिरताना दिसत होते. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळाली. अत्यावश्यक कारण सांगत वाहनधारक रस्त्यावर फिरताना दिसत होते. पोलिसानी काही ठिकाणी नाकाबंदी केली असली तरी प्रत्येक जण अत्यावश्यक काम असल्याचे कारण सांगून पोलिसांना फसवत असल्याचे दिसले. यामुळे दिवसभर रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम होती.
वाचा:
पोलिसांनी अनेक वाहनचालकांवर कारवाई केली. काही वाहने जप्तही केली. त्यापुढे जात शनिवारपासून आता अधिक कडकपणे संचारबंदीचे नियम पाळण्यात येणार आहेत. दरम्यान, महापालिकेनेही विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होणाऱ्या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका लक्षात घेता शहरात मोबाइल व्हॅनच्या पथकाद्वारे रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना प्रशासक डॉ. यांनी उपायुक्त निखील मोरे यांना दिल्या आहेत.
महापालिकेच्या या पथकाद्वारे शहरातील ज्या ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी शनिवार पासून कोविड टेस्ट करण्यात येणार आहे. याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ विलगीकरण कक्षात पाठविण्यात येणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times