म. टा. विशेष प्रतिनिधी,

राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री यांनी राज्यात येत्या तीन ते चार दिवसात जाणवणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. केव्हा आणि कसे वापरायचे याचा प्रोटोकॉल पाळला जात नसल्याने राज्यात भीषण स्थिती निर्माण झाल्याचेही शिंगणे यांनी सांगितले.

शिंगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. रेमडेसिव्हिरबाबत आम्ही टेंडर मागविले आहेत. मात्र, रेमडेसिव्हिरच्या किमतीबाबत कंपन्यांचा गैरसमज झाला आहे. आम्ही कमी किमतीत रेमडेसिव्हिर खरेदी करणार नाही. आम्हाला कंपन्यांचे नुकसान करायचे नाही,’ असेही शिंगणे यांनी सांगितले. काही कंपन्यांनी महाराष्ट्रात एकही इंजेक्शन पुरवलेले नाही, असेही शिंगणे म्हणाले. राज्यात रेमडेसिव्हिरचा साठा कमी आहे. राज्यात दररोज जवळपास १२ ते १५ हजार इंजेक्शन्सचा तुटवडा भासत आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत जवळपासचा तुटवडा अधिकच जाणवणार असल्याचेही शिंगणे यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार निर्यातबंदीचा साठा राज्यात मिळू शकेल असा निर्णय झाला आहे. राज्याला जास्तीत जास्त ‘रेमडेसिव्हिर’चा साठा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.

‘गरज असेल तरच द्या’

‘काही कंपन्यांनी राज्याला रेमडेसिव्हिरचा कमी पुरवठा केल्याने खासगी रुग्णालयांतही तुटवडा निर्माण झाला आहे, असं सांगतानाच रेमडेसिव्हिर कधी आणि कसे वापरायचे याचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. त्यामुळे रेमडेसिव्हिरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत ज्यांना गरज आहे, त्यांनाच हे इंजेक्शन द्या, अशा सूचनाही शिंगणे यांनी केल्या. ‘सरकारी रुग्णालयात रेमडेसिव्हिरची सुदैवाने कमतरता नाही. मात्र, खासगी रुग्णालयांत तुटवडा जाणवत आहे. पुण्यात तुटवडा जाणवतोय तो दूर करण्यासाठी मी आयुक्तांना सूचना करणार आहे. दुसरीकडे हाफकीनच्या माध्यमातून चांगलं काम होत आहे. १५० कोटी रुपये खर्च करून आपण सुरुवात करणार आहोत. प्राथमिक खर्चासाठी पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात येईल,’ असेही शिंगणे यांनी नमूद केले.

रायगडसाठी पाच टक्के रेमडेसिव्हिर

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पुरवठ्याच्या फक्त पाच टक्के रेमडेसिव्हिर पुरवठा होत आहे. उर्वरित ९५ टक्के पुरवठा पनवेल आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात होत असल्याने रायगड जिल्ह्यासाठीही योग्य प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा होण्याबाबत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रवीण ठाकूर यांनी केली.

पाच हजार कुप्या उपलब्ध
ठाणे : करोनावर उपकारक ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पाच हजार १७ कुप्या ठाणे जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षात उपलब्ध झाल्या असून, संबंधित करोना रुग्णालयांमध्ये मागणीनुसार त्या वितरीत केल्या जाणार आहेत. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असताना अत्यवस्थ रुग्णांना तातडीने द्याव्या लागणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here