नातेवाईकांच्या या आरोपमुळे अंबोजोगाईत खळबळ उडाली आहे. नाशिकमधील घटना आजच घडल्याने अंबाजोगाईत जर वाढत गेली, तर आमच्या रुग्णांचे कसे होणार याची चिंता अंबाजोगाईतील रुग्णांच्या नातेवाईकांना सतावू लागली आहे. जर ऑक्सिजनची कमतरता होती तर रुग्णालय प्रशासनाने याबाबत आधीच खबरदारी का घेतली नाही, असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. या ५ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेला नसल्याचे ते म्हणाले. सध्या आमच्याकडे रुग्णांसाठी लागणारा आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘मृतांना इतर शारीरिक आजार होते’
आज दिवसभरात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एकूण ११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाले असून आज मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांचे वय हे ६० वर्षांपर्यंत आहे. यामधील अधितकर रुग्णांना विविध शारीरिक आजार होते, अशी माहिती शुक्रे त्यांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times