नागपूरः हरिद्वार येथे संपलेल्या कुंभमेळ्यासाठी नागपूरसह विदर्भातील भाविकही गेल्याचे समोर आले आहे. हे भाविक आगामी काही दिवसांमध्ये नागपुरात परतण्याची शक्यता असून, ते परतल्याने करोनाच्या प्रादूर्भावात अधिक वाढ होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारीच्या उपायोजना आखल्या आहेत. कुंभ व उत्तरेकडून नागपुरात येणारे प्रवाशी पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या रडारवर असणार आहेत. कुंभ मेळ्याहून परतणाऱ्या भाविकाला १४ दिवसांसाठी गृहविलगीकरणात राहावे लागेल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘मटा’ला दिली.

विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेत रविवारी पोलिस अधिकारी, रेल्वे व रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. उत्तरेकडून दक्षिणेकडे रोज २२ ते २५ गाड्या जातात. या गाड्यांना नागपुरात थांबा आहे. या रेल्वेत नागपूरसह विदर्भातील प्रवाशांनी आरक्षण केले आहेत. ते नागपुरात येताच त्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. नागपूर व विदर्भातील प्रवाशांची यादी पोलिस, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात येणार आहे. यात त्यांचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक असेल. निमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांची थेट संस्थात्मक विलगीकरणात रवानगी करण्यात येईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here