पालघर: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना ताजी असतानाच आज पालघर जिल्ह्यात आगीची भयंकर घटना घडली आहे. विरार येथील विजय वल्लभ हाॅस्पिटल या कोविड रुग्णालयात लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मध्यरात्री तीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयूमधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये ही आग लागली. वॉर्डात ऑक्सिजन असल्यानं आग लगेचच सर्वत्र पसरली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. आगीची घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. अग्निशामक दलाने तात्काळ हालचाली करून चार रुग्णांना वाचवले. मात्र, इतर १३ रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती वसई-विरार महापालिकेनं दिली आहे. काही तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली असल्याचे अग्निशमन दलाचा अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसरीकडं हलवण्यात आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here