म. टा. प्रतिनिधी, मुंबई
करोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात धोरणाबाबत सुधारित निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन गृहमंत्री यांनी केले आहे. तसेच, पोलिस यंत्रणांनी दक्ष आणि सतर्क राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

राज्यात मार्च २०२१ पासून करोनाची दुसरी लाट आली असून त्यामध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. परंतु या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेने योग्य ती खबरदारी घ्यावी. कडक निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करताना करोनाची संसर्ग साखळी तोडणे हा आपला मुख्य उद्देश आहे, हे लक्षात ठेवावे. त्याप्रमाणे नियोजन करावे. कारवाई करताना जनहितास बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी असे ते म्हणाले.

वाचा:

अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी नियम मोडले जाणार नाहीत किंवा गर्दी होणार नाही, यासाठी स्थानिक पोलिस यंत्रणेने योग्य ते नियोजन करावे. गर्दीची ठिकाणे करोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार ठरत असल्याचे लक्षात आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे पोलिस प्रशासनाने पाहावे, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सर्वांच्या सहभागातून आपण करोनाचा प्रसार रोखू शकतो. सर्व नागरिकांनी या त्रिसूत्रीचे पालन करावे आणि शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here