नागपूर: नागपूर येथील जीपीओ चौकातील निवासस्थानी माजी गृहमंत्री यांची अकरा तास चौकशी केल्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सीबीआयचे पथक परत गेले होते. त्यानंतर काही वेळाने देशमुखही काटोलकडे रवाना झाले. सुमारे अर्ध्या तासानंतर सीबीआयचे पथक पुन्हा देशमुख यांच्या निवासस्थानी धडकले आहे. तोपर्यंत देशमुख हे गोरवाडा भागात पोहोचले होते. सीबीआयचे पथक परत आल्याची माहिती मिळताच देशमुखही निवासस्थानी परत आले. दरम्यान, रात्री दहाच्या सुमारात हे अधिकारी देशमुख यांच्या घरातून निघाले. ( )

वाचा:

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं आढळल्यानंतर काही दिवसांनी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला. देशमुख यांनी यांना दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा त्यांचा दावा आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने चौकशीला सुरूवात करून देशमुख यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज सकाळी सात वाजताच्या सुमारास डीएल-२- एव्ही-८८९८ आणि एमएच-३१-डीझेड-९९९९ क्रमांकाच्या दोन कारमधून महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात सीबीआयचे पथक देशमुख यांच्या निवासस्थानी धडकले. यात दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. देशमुख व त्यांचे कुटुंबीय घरीच होते. सीबीआयच्या पथकाने तब्बल ११ तास निवासस्थानाची झाडाझडती घेतली. सीबीआयने काही दस्तऐवजही जप्त केले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कोविड नियमांचे पालन केले. चार अधिकारी पीपीई किट घालून होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सीबीआयचे पथक देशमुख यांच्या निवास्थानातून बाहेर निघाले. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांना चौकशीत संपूर्ण सहकार्य करण्यात आले, असे देशमुख यांनी सांगितले. आता मी काटोल मतदार संघातील विलगीकरण केंद्राची पाहणी करण्यासाठी जात आहे, असे सांगून देशमुख निघाले. दरम्यान, काही वेळातच पथक परत देशमुख यांच्या घरी परतले आहे. ही माहिती मिळताच देशमुख हेसुद्धा घरी आले. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास परत आलेल्या सीबीआय पथकाने ७ वाजल्यापासून रात्री १० वाजातपर्यंत तीन तास देशमुख यांची चौकशी केली. त्यानंतर पथक काही महत्त्वाचे दस्तावेज पिशवीतून घेऊन गेले. सीबीआय पथक गेल्यावर अनिल देशमुख परत बाहेर पडले व काटोल येथे नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या विलागीकरण केंद्राला भेट देण्यासाठी रवाना झाले.

वाचा:

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

सीबीआयने छापा टाकल्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास युवक काँग्रेसचे पदाधिकारी जीपीओ चौकात धडकले. त्यांनी सीबीआय ,केंद्र सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सीताबर्डी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर तणाव निवळला. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जीपीओ चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

आयबीची पाळत

गत चार दिवसांपासून आयबीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर पाळत ठेवून होते. नागपुरातील सीबीआयचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात आली, अशी माहिती आहे. आगामी काही दिवस आयबीच्या अधिकाऱ्यांची जीपीओ चौकावर नजर असणार आहे, असे कळते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here