मुंबई : गेल्या काही सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ याला मोठी खेळी साकारता आली नव्हती. पण आजच्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने धडाकेबाज फटकेबाजी करत अर्धशतक साकारले होते. पण यावेळी अर्धशतक झळकावल्यावर पृथ्वी जास्त काळ खेळू शकला नाही. कारण एका चुकीमुळे पृथ्वी रन आऊट झाला. पण रन आऊट झाल्यावर पृथ्वी यावेळी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला.

नेमकं घडलं तरी काय, पाहा…ही गोष्ट घडली ती बाराव्या षटकात. बाराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत फलंदाजी करत होता. हा चेंडू पंतला समजला नाही आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या जवळ गेला. यष्टीरक्षकालाही यावेळी चेंडू पकडता आला नाही. त्यावेळी एकेरी धाव घेण्यासाठी पृथ्वी शॉ पुढे सरसावला. पृथ्वीला यावेळी धाव घेण्यासाठी पंतनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. पंतही काही पावले पुढए सरसावला, पण त्यानंतर त्याने धाव घेणार नसल्याचे सांगितले. तोपर्यंत बराच उशिर झाला होता. कारण पृथ्वीने अर्ध्या खेळपट्टीवर होता. त्यावेळी पृथ्वी माघारी फिरला. पण पृथ्वी फार पुढे निघून गेला होता. त्यामुळे क्षेत्ररश्रक खलील अहमदने यावेळी गोलंदाज सुचितकडे चेंडू फेकला आणि पृथ्वी धावचीत झाला. पृथ्वीने आजच्या सामन्यात ३९ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. पण पृथ्वीला यावेळी अर्धशतकानंतर जास्त धावा करता आल्या नाहीत.

पृथ्वीने भडकल्यावर काय केले, पाहा…पृथ्वी धावचीत झाल्यावर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. कारण पृथ्वीला यावेळी शतक झळकावण्याची संधी होती. त्याचबरोबर यामध्ये कुठेतरी रिषभ पंतचीही चुक होती. त्यामुळे पृथ्वी यावेळी रागाच्या भरात पेव्हेलियनच्या दिशेने निघाला. पृथ्वीने मैदान सोडल्यावर संघाच्या डग आऊटच्या येथे आपला राग व्यक्त केला. पृथ्वीने यावेळी आपले हेल्मेट मैदानात फेकून दिल्याचे पाहायला मिळाले. पृथ्वीने यावेळी आपाल सर्व राग डगआऊटच्या येथे आपल्या हेल्मेटवर काढला. त्यानंतरही पृथ्वी रागाच्या भरात असल्याचेच पाहायला मिळाले. त्यानंतरही पृथ्वी रागात होता आणि तो पेव्हेलियनच्या दिशेने जात असल्याचे समजले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here