‘सर्वोच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे, त्यामुळे निवडणूक टाळण्यासाठी आता जागतिक न्यायालयात जाऊ नका’, असा टोला यांनी पत्रकार बैठकीत सत्ताधारी आघाडीला मारला. दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ ची निवडणूक पुढे ढकलावी म्हणून सत्ताधारी आघाडीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे दोन मे रोजी होणाऱ्या मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील बोलत होते. (do not go to the world court now criticizes regarding )
पालकमंत्री पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सत्ताधाऱ्यांनी मान राखावा हा लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून गोकुळचे पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मात्र आता स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधारी गटाने जागतिक न्यायालयात जाऊ नये, त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, गोकुळची निवडणूक घेण्याचा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने मतदान बुथ दुप्पट करण्याची सूचना केली आहे. यानुसार ३५ ऐवजी ७० ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होईल. त्यामुळे आता ही निवडणूक व्यवस्थित पार पडेल. ते म्हणाले, आपल्या देशाने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीला महत्त्वाचे स्थान आहे. गोकुळ मध्येही निवडणूक व्हावी हीच आमची भूमिका होती.
क्लिक करा आणि वाचा-
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, हा सभासदांचा हा विजय आहे. सत्ताधारी मंडळी सतत न्यालायचे दरवाजे ठोठावत होते. त्यांचा आत्मविश्वास नव्हता. आत्मविश्वास नसल्यानेच भीतीने ते निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र या निकालामुळे दूध उत्पादक सभासदांना न्याय मिळाला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
दोन मे रोजी होणाऱ्या गोकुळ निवडणुकीत ३६४८ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये ४० मतदारांना करोनाची बाधा झाली आहे. हे मतदार पीपीई किट घालून मतदान करणार आहेत. मतदान केंद्रावर एकावेळी पन्नासपेक्षा अधिक मतदारांची गर्दी होवू नये याची काळजी घेण्याचे प्रशासनाला आदेश दिल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times