नांदेड: वारंवार निवेदनांद्वारे मागणी करूनही जिल्ह्यातील येथील वन विभागातील वन्य प्राण्यांच्या शिकार प्रकरणाची चौकशी झाली नाही. त्यामुळे केले. चौकशी न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पण त्याकडे संबंधित विभाग आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

जिल्ह्यातील वन परिक्षेत्रातील येथील चोंडी वन गाव परिसरातील राखीव जमिनीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू होती. त्यावेळी चार हरीण आणि १० मोरांची शिकार झाली होती. त्या प्रकरणाची चौकशी वनविभागाने करावी; अन्यथा आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा लोहा तालुक्यातील चोंडी येथील शिवदास ढवळे या सामाजिक कार्यकर्त्याने दिला होता. याबाबत वारंवार त्यांनी चौकशी करण्याची मागणी करणारी निवेदने वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे आणि तहसीलदारांना दिली होती.

वन्यप्राण्यांच्या शिकारी प्रकरणाची चौकशी न झाल्याने ढवळे यांनी आत्मदहन केले. प्रशासनाकडे निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने ढवळे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगत, त्यांचे नातेवाइक आक्रमक झाले. त्यांनी माळाकोळी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. नांदेडचे सहायक वनसंरक्षक, वन विभागातील अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, चोंडीचे सरपंच यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, माळाकोळी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here