काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते असणाऱ्या शिंगडा यांची देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुले, नातवंडे असा परिवार आहे. शेतीनिष्ठ शेतकरी व तळागाळातील जनसामान्यांचे नेते म्हणून ओळख असणाऱ्या शिंगडा यांच्या जाण्याने आदिवासी समाजासह ग्रामीण भागातील खंदे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
यांनी वाहिली श्रद्धांजली
दामोदर शिंगडा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातून आलेल्या दामोदर शिंगडा यांनी आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते सक्रिय राजकरणात आले. लोकांशी जुळलेली नाळ व दांडगा जनसंपर्कामुळे शिंगडा आदिवासी समाजात अत्यंत लोकप्रिय होते. सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणा-या दामोदर शिंगडा वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.
पोशेरी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शाळा आणि विद्यालयं सुरु करून दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times