पंढरपूर: दिवंगत आमदार यांच्या पुण्याईच्या जोरावर मतदारसंघाची पोटनिवडणूक काँग्रेसला एकतर्फी वाटत होती. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यानंतर तासाभरातच चित्र पालटू लागलं. सुरुवातीला आघाडीवर असलेले यांना यांनी मागे टाकले आणि नंतर प्रत्येक फेरीत चुरस पाहायला मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत ही उत्कंठा कायम होती आणि शेवटी अवताडे यांनी निसटता विजय मिळवला. वास्तविक सलग तीन वेळा भल्याभल्यांना चारीमुंड्या चित करीत येथे पैलवान भारत भालके यांनी आपला दबदबा राखला होता. जिवंतपणी त्यांना पराभूत करणे समाधान अवताडे आणि प्रशांत परिचारक याना जमले नाही पण त्यांच्या निधनानंतर या दोघांनी संधी साधली व एकत्र येत भाजपचा विजय सुकर करून दिला. ( )

वाचा:

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून झालेल्या काही चुका टाळता आल्या असत्या तर ही जागा मोठ्या फरकाने राष्ट्रवादीने जिंकली असती. भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा मिळणार आणि सहानुभूती मिळणार हे स्पष्ट होते. त्यासाठी राष्ट्रवादीने त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर निश्चितच निकाल वेगळे लागले असते. मात्र तसे झाले नाही. राष्ट्रवादीने त्यांच्या पत्नी ऐवजी मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. त्यांचा प्रचारही दणक्यात झाला. पण शेवटच्या काही दिवसांत सहज विजय मिळेल या विश्वासावर राष्ट्रवादी गाफील राहिली आणि याचाच फायदा भाजपने घेतला. वास्तविक गेल्या दोन निवडणुकांत भारत भालके यांच्या विरोधात अवताडे व परिचारक हे वेगळे लढले होते. त्यामुळे भालकेंचा विजय सुकर होत गेला होता. अवताडे आणि परिचारक या दोघांच्या मतांची बेरीज भालके यांच्यापेक्षा खूप जास्त असायची. यंदा हेच गणित भाजपने डोक्यात ठेवले. कायम दुसऱ्या स्थानावर राहणाऱ्या परिचारक यांना उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी तिसऱ्या नंबरच्या अवताडे यांना उमेदवारी दिली गेली आणि हीच चाल यशस्वी ठरली. अवताडे आणि परिचारक यांच्या मतांची गोळाबरीज होवून त्यातून भालके यांचा विजयरथ रोखला गेला.

वाचा:

पोटनिवडणुकीत केवळ ६६ टक्के मतदान झाले होते आणि खरी लढत अवताडे व भालके यांच्यातच झाली. भारत भालके यांच्यासाठी असलेल्या सहानुभूतीमुळे त्यांच्या मुलाच्या पदरात थेट १ लाख पाच हजार ७१७ एवढी मते टाकत मतदारांनीही प्रेम दाखवून दिले. विशेष म्हणजे भारत भालके यांना २०१९ च्या निवडणुकीत ८९ हजार मिळाली होती तर आता त्यांच्या पश्चात जनतेने त्यांच्यापेक्षा १५ हजार जास्त मते भगीरथ यांना दिली. तरीही राष्ट्रवादी आणि भगीरथ यांचे शेवटच्या दोन दिवसांतील प्रयत्न थिटे पडले आणि निकाल फिरले, असेच आता बोलले जात आहे. राष्ट्रवादीसाठी एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर भाजपने वातावरण निर्मिती केली. त्यातून या निवडणुकीला अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा रंग चढला. ज्यात फडणवीस हे अजित पवार व जयंत पाटील यांच्यापेक्षा सरस ठरले. गोपीचंद पडळकर यांनी भालके यांच्या हक्काची धनगर मते मोठ्या प्रमाणात फिरवली. त्याचा फटकाही राष्ट्रवादीला बसला. प्रचारात नेत्यांची फौज स्टेजवर उभी करणाऱ्या राष्ट्रवादीने या नेत्यांच्या मागे नेमकी मते किती याचा अंदाज घेतला असता तर हा पराभव झाला नसता, असेही जाणकार सांगतात. प्रचारात जे आघाडीवर होते त्यातील काही मंडळी नेमकी मतदानादिवशी गाफील राहिल्याने भाजपने याचा फायदा घेतला आणि हातातून गेलेला डाव फिरवला हे आता स्पष्ट झाले आहे.

वाचा:

या निवडणुकीत बंडखोर व काही पक्षांकडून मतविभागणीचे अंदाज दोन्ही बाजूकडून बांधले गेले मात्र जनतेने स्वाभिमानी, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना बंडखोर आणि अवताडे यांच्या घरातून झालेल्या बंडखोरांना थेट कात्रजचा घाट दाखवल्याने सर्वांच्या अनामत रकमाही जप्त झाल्या. मतदाराने केवळ भाजप आणि राष्ट्रवादीला मतदान केले आणि यात भाजपने बाजी मारली. निसटला विजय असला तरी ‘जो जिता वही सिकंदर’ हेच अंतिम सत्य असते. ही पोटनिवडणूक असल्याने आता २०२४ साली पुन्हा एकमेकांच्या समोर भगीरथ आणि समाधान उभे ठाकतील. त्यावेळी आताइतकी सहानुभूतीची लाट राहणार नसल्याने जिंकायच्या तयारीने भगीरथ भालके यांना आतापासूनच प्रयत्न करावे लागणार आहेत तर मिळालेली आमदारकी कायम ठेवण्यासाठी समाधान अवताडे यांनाही भरीव कामासोबत जनतेत लोकप्रियता मिळवावी लागणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here