वाचा:
काल बुधवारी यावल शहरात राहणारे दीपक व युवराज हे दोघे आपल्या मित्रांसोबत यावल-भुसावळ रस्त्यावरील हतनूर पाटबंधारे विभागाच्या पाटात पोहण्यासाठी गेलेले होते. सध्या या पाटचारीत शेती पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाटचारी पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्या मित्रांनी बचावासाठी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत दोघे बुडाले होते.
वाचा:
हतनूर पाटचारीच्या पाण्यात दोन मुले बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लगेचच शोधकार्य सुरू झाले. काल दुपारपासून या दोन्ही मुलांच्या मृतदेहांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडले. या घटनेमुळे यावल शहरातील सुदर्शन चित्रमंदिर परिसरावर एकच शोककळा पसरली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times