मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आरोग्य विभागात तब्बल 16 हजार पदांवर भरती होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा होत असताना आरोग्य विभागाच्या या निर्णयाचं कौतूक होत आहे.

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशा एकूण ४ हजार पदांवर भरती केली जाणार असून क आणि ड वर्गात 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश देण्यात आले असल्याची माहितीही यावेळी राजेशी टोपे यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना यासंबंधी त्यांनी खुलासा केला आहे.

(बातमी पुढे अपडेट होत आहे)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here