‘आम्हाला लस पाहिजे म्हणून सगळे जण पुनावाला यांना दमच देत सुटले. मात्र, ब्रिटनमध्ये जाऊन ते जे बोलले ते खरेच बोलले. एवढ्या मोठ्या देशासाठी एक रात्रीतून लस बनविता येऊ शकत नाहीत. त्यांचे हे म्हणणे खरेच आहे. पुनावाला हे काही राजकारणी नाहीत. शिवाय ते जे काही सांगत आहेत, त्यात तथ्य आहे. त्यामुळे उत्पादनातील मर्यादा लक्षात घेऊन आपण लसीकरणाचे नियोजन केले पाहिजे. जेवढा कोटा मिळत आहे, त्याचे काळजीपूर्वक नियोजन केले पाहिजे. राज्याला जास्त कोटा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करीत आहोत, असं थोरात यांनी म्हटलं आहे.
‘परदेशातील काही लशीही आपल्याला उपलब्ध होणार आहेत. दोन-तीन महिन्यात भरपूर प्रमाणात लस यायला सुरवात होईल. सध्या तरी जेवढी मिळत आहे, त्याचे योग्य वाटप आणि नियोजन झाले पाहिजे. लसीकरणासाठी गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या राज्यात आरोग्यसेविका आणि आरोग्य क्षेत्रातील शेवटचे घटक चांगले काम करीत आहेत. राज्यपातळीवर मुख्यमंत्री, मंत्री निर्णय घेत असतात, तरी खऱ्या अर्थाने हे काम आरोग्य क्षेत्रातील या खालच्या घटकाच्या हातात आहे. आतापर्यंत ज्या धडाडीने काम केले, ते तसेच सुरू ठेवा. संकट अद्याप ठळलेले नाही. मधल्या काळातील गहाळपणाच आपल्याला नडला. त्यामुळेच दुसरी गंभीर लाट आज पहायला मिळत आहे. पुढील काही महिने तरी आपण असेच काम सुरू ठेवू. दिवाळी चांगली गेली पाहिजे, असे लक्ष्य ठेवून काम करण्याची गरज आहे,’ असेही थोरात म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times