मुंबईः मुंबईत करोना संसर्ग नियंत्रणात येत असताना मुंबई महानगरपालिकेच्या करोना लढ्याची दखल सर्वोच्च न्यायालयानंही घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या कौतुकानंतर आता केंद्र सरकारच्या नीती आयोगानंही मुंबईतील करोना व्यवस्थापनाची दखल घेत स्तुती केलं आहे.

मुंबईत झपाट्याने वर गेलेला करोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नियंत्रणात येऊ लागला आहे. निर्बंधांची कठोर मात्रा, ऑक्सिजनचं व्यवस्थापन यामुळं रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. तसंच, महापालिकेनं तातडीने काही उपाययोजना राबवल्या होत्या तसंच ऑक्सिजन बेडची माहिती, रुग्णालयाची माहिती, रेमडेसिव्हीर याचेही नियोजन करण्यात आलं होतं. या नियोजनामुळं करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात यश आलं असल्याचं म्हटलं आहे. ऑक्सिजन व्यावस्थापनाच्याबाबतीत दिल्लीनं मुंबईकरांकडून बोध घ्यावा, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही मुंबई महानगरपालिकेचं कौतुक केलं आहे.

‘केंद्रीय पद्धतीने बेडचं वाटप करणं, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणं, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचंही वाटप करणं आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबॉर्ड तयार करणं, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणं. करोना व्यवस्थापनाचं प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचं अभिनंदन,’ असं म्हणत अमिताभ कांत पालिका व आयुक्तांचं कौतुक केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here