यासंदर्भात हिलाल सीरत कमिटीच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत बुधवारी रात्री गुरुवारी रमजान महिन्याचा शेवटचा उपवास (तिसावा) करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (१४मे ) रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे, असा निर्णय हिलाल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.
दरम्यान, रमजान ईद साजरी करण्याबाबत राज्य शासनाने नियमावली जारी केली आहे. त्याद्वारे मुस्लिम बांधवांनी ईद साजरी करण्यासाठी एकत्र न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, तर सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच, नमाज पढण्यासाठी मशिदीत किंवा मोकळ्या जागेत देखील एकत्र येऊ नये, अशीही सूचना शासनातर्फे देण्यात आली आहे. रमजान ईदेच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले आहे. या वेळेचे तंतोतंत पालन करण्यात यावे आणि त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये, अशीही सूचना करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच या निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नियमावलीत म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times