मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपायोजना करण्यासाठी मंगळवारी आपण स्वतः व पालकमंत्री सतेज पाटील मुंबईला गेलो होतो. ऑक्सीजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्यासाठी त्याठिकाणी पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून काल जवळपास तिप्पट -चौपट इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर १५ टन ऑक्सीजन वाढवून मिळालेला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बेड उपलब्ध आहेत. कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून आठवड्याभरात हे सर्व आटोक्यात येईल.
याआधी जिल्ह्याला दररोज सरसकट ३० टन पुरवठा होत होता. तो वाढून आजपासून सरासरी ४५ टन आणि त्याहून अधिक ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल. तसेच, याआधी जिल्ह्याला दररोज सरासरी अडीचशे ते तीनशे इंजेक्शन मिळत होती. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व्यवस्थित सुरू झालेला असून आजच अडीच हजाराहून अधिक इंजेक्शन पुरवठा झालेले आहेत, असेही मुश्रीफ पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
नेत्यांच्या सवडीच्या निर्णयामुळेच करोनाची स्थिती गंभीर झाली आहे आणि याबाबत निर्णय घेण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी केला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमच्यावर आरोप करणारे माजी आमदार अमल महाडिक नुकत्याच झालेल्या गोकुळ निवडणुकीत अग्रभागी होते. त्यामुळे मनुष्यवधाच्या गुन्ह्यात त्यांनाही सहआरोपी करावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाफीलपणा केला याचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूदर जास्त असला तरी आपण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये करोनाचा कहर आता वाढलेलाच आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times