नवी दिल्लीः ‘तौत्के चक्रीवादळा’चा ( ) तडाखा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ आणि गोव्याला बसला. हे गुजरातच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज गुजरात आणि दमण-दीवमधील नुकासानग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. यानंतर केंद्र सरकारकडून गुजरातला १००० कोटींची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली ( ) आहे. यासोबत वादळात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनाही केंद्राने मदत घोषित केली आहे.

तौत्के चक्रीवादळाचा गुजरातच्या किनारपट्टीवरील भागांना मोठा तडाखा बसला आहे. पतंप्रधान मोदींनी उना, जाफराबाद, महुआ या नुकसानग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री विजय रुपानी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी मदत आणि पुनर्वसनासंबंधी घेण्यात आलेल्या निर्णयांवर चर्चा करण्यात आली.

तौत्के चक्रीवादळातील मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा

केंद्र सरकारने गुजरातला १ हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासोबत केंद्र सरकारने तौत्क चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये वादळात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबींना २ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या पाठीशी सरकार आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असं पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी गुजरात सरकारला मदत आणि बचावकार्यासाठी तातडीची १ हजार कोटींची आर्थिक मदत घोषित केली आहे. यासोबतच गुजरातमधील नुकसानग्रस्त भागाचा आढावा आणि नुकासनाची अंदाज घेण्यासाठी केंद्र सरकार एक पथक नेमणार आहे. या पथकाने केलेल्या पाहणीच्या आधारावर गुजरातला आर्थिक मदत केली जाईल. या कठीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्यासोबत आहे. आणि वादळाने नुकसान झालेल्या भागात जनजीवन सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं आहे. गुजरातमध्ये चक्रीवादळामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरात दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी करोनाच्या स्थितीचाही आढावा घेतला. राज्य सरकारकडून पंतप्रधान मोदींना माहिती देण्यात आली. तसंच पंतप्रधान मोदींनी वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांबद्दल संवेदनाही व्यक्त केल्या.

गुजरातमध्ये चक्रीवादळाने ४५ मृत्यू

गुजरातमध्ये तौत्के चक्रीवादळामुळे ४५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर किनारपट्टी भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये चक्रवीदळाने १६ हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. ४० हजारांहून अधिक झाडं कोसळली आहे. तर १ हजाराहून अधिक विजेचे खांब उखडले गेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here