देवेंद्र फडणवीस सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून वादळामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलताना बोलत होते. पंतप्रधान मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले? असा सवाल करता मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलादेखील बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाही?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेंट करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवाय, वादळाचा अॅलर्ट असताना देवगडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही?, असा सवालही फडणवीसांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times