भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘देवेंद्रजी..काय राव तुम्ही थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचतां मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना, ३ तासाच्या कोकण दौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या, कितींच सात्वंन केलं, हे सगळ कृपा करून विचारू नका, आणि हो पर्यटन फोटोसेशन ३ तासात शक्य नाही म्हणून रद्द केलयं!’
क्लिक करा आणि वाचा-
चित्रा वाघ यांच्या पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकण दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी नव्हे ते बाहेर पडले आहेत. ते दीड वर्षानंतर बाहेर पडले आहेत. त्यांनी आता इतरांना उपदेश करण्याचे काही कारण नाही. माझा हवाई प्रवास नाही माझा जमिनीवरून प्रवास आहे, असे ते म्हणतात. मात्र, तुमचा जमिनीवरचा प्रवास आणि तुमचे पाय जमिनीवर राहण्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times