नवी दिल्लीः अॅलोपॅथी डॉक्टरांवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू ( ) यांनी मागे घ्यावं, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन ( ) यांनी म्हटलं आहे. आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी या प्रकरणी रामदेव बाबांना एक पत्र लिहिलं आहे. अॅलोपॅथीवर टिपणी करणारा रामदेव बाबांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ( ) होता. यावरू इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेत रामदेव बाबांना कायदेशीर नोटीसही बजावलीय. आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी रामदेव बाबांना डॉक्टरांवरील आक्षेपार्ह वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं आहे.

करोनाच्या या संकटात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी हे दिवस-रात्र काम करत असून ते देवासमान आहेत. रामदेव बाबांनी आपल्या वक्तव्यातून करोना योद्ध्यांचा अपमान केला आहे. यामुळे देशातील अनेकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. यामुळे रामदेव बाबांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, असं आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्र लिहून आवाहन केलं आहे.

अॅलोपॅथी औषधोपचार आणि डॉक्टरांवरील केलेल्या टिपणी संपूर्ण देशात नाराजी आहे. या बद्दल आपणाला मी फोनवरून आधीच जाणीव करून दिली आहे. करोनाच्या यासंकटात संपूर्ण देशासाठी डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी हे देवासमान आहेत. आपल्या वक्तव्याने फक्त करोना योद्ध्यांचा अपमान झालेला नाही तर देशावासियांच्या भावनांनाही ठेच पोहोचली आहे. तुम्ही जे स्पष्टीकरण जारी केले आहे, ते पुरेसे नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.

करोनाच्या या महामारीत डॉक्टरांनी कोट्यव नागरिकांना नवीन जीवन दिले आहे. अशा वेळी लाखो नागरिकांचा मृत्यू हा अॅलोपॅथी औषधांमुळे झाल्याचं म्हणणं अतिशय दुर्दैवी आहे. अॅलोपॅथी उपचार पद्धती ही दिवाळखोरी असल्याचं म्हणणं लाजीरवाणं आहे. करोनामुक्त होऊन अनेक नागरिक घरी जात आहेत. करोनाने होणारा मृत्यू दर हा १.१३ टक्के आणि करोनामुक्त होण्याचा दर ८८ टक्के इतका अधिक आहे. यामागे अॅलोपॅथी डॉक्टरांचे बहुमूल्य योगदान आहे, असं आरोग्यमंत्री म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here