वाचा:
करोनाच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईकरांना दिलासा देणारे आकडे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. नवीन बाधितांची संख्या, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण, रुग्ण दुपटीचा कालावधी, सक्रिय रुग्णांची संख्या असे सर्वच आकडे बऱ्यापैकी नियंत्रणात आले आहेत. त्याचवेळी मृतांचा आकडा ही मात्र आजही चिंतेची बाब आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत करोनाने ४९ जणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत करोनाच्या विळख्यात सापडलेल्या १४ हजार ६२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा राज्यात सर्वाधिक आहे.
वाचा:
मुंबईतील करोनाच्या आजच्या इतर आकडेवारीवर नजर मारल्यास गेल्या २४ तासांत १ हजार ४३१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्यापेक्षा किंचित जास्त १४७० रुग्ण करोनावर मात करून आज घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत करोनाचे एकूण ६ लाख ९७ हजार ८१० रुग्ण आढळले आहेत तर ६ लाख ५२ हजार ६८६ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. मुंबईत सध्या करोनाचे २८ हजार ४१० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. हा आकडा गेले काही दिवस वेगाने खाली येत आहे.
वाचा:
पालिका क्षेत्रात आज २३ हजार ३१४ जणांची करोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत ६० लाख ७२ हजार चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मुंबईतील करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३ टक्क्यांवर पोहचले आहे. १६ मे ते २२ मे पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२० टक्के इतका राहिला आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल ३३१ दिवसांवर पोहचला आहे. मुंबईतील करोना साथ नियंत्रणात येत असताना आणि सील इमारतींचा आकडाही कमी होऊ लागला आहे. सध्या चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये ५३ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर मुंबईत एकूण २१९ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times