पुणे: पावसाळ्यात होणारे आजार आणि करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने बालकांचे नियमित केले नसल्यास पालकांनी सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन बालकांचे नियमित लसीकरण करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात आले आहे. ( )

वाचा:

संसर्गामुळे रुग्णालयांमध्ये जाऊन बालकांचे नियमित लसीकरण करावे की नाही, याबाबत पालकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी आणि आगामी काळात बालकांना संसर्गाचा धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने नियमित लसीकरण करून घेण्याची सूचना केली आहे. बालकांचे नियमित लसीकरण झाले नसल्यास सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन लस दिली पाहिजे. त्यामुळे बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळू शकेल. करोना महामारी काळातही सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये लशी उपलब्ध असल्याचे राव यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा:

लसीकरण का घटलं?

करोना प्रतिबंधक लसीकरणाला लशींच्या खडखडाटामुळे खंड पडला असताना दुसरीकडे करोनाच्या संसर्गाची भीती तसेच लॉकडाऊनमुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयातील बालकांच्या नियमित लसीकरणाला यंदाच्या वर्षी पुन्हा ब्रेक लागला आहे. जून महिन्यापासून सुरू होणारा पावसाळा, त्यानंतर संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्ग अधिक होण्याची भीती यामुळे पुणे विभागीय बालरोग समितीने बालकांचे नियमित लसीकरणावर भर देण्याची सूचना बालरोग तज्ज्ञांना केली आहे. शहरातील ७० दवाखान्यांपैकी गेल्या वर्षी ३५ दवाखाने सुरू करण्यात आले होते. वर्षभरात पुण्यातील ५५ ते ६० हजार बालकांना लसीकरण करण्यात येते. गेल्या वर्षभरात बालकांना २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा दुसरी लाट सुरू झाली. एप्रिलपासून पुण्यात लॉकडाऊन आणि करोना लसीकरण सुरु असल्याने बालकांच्या लसीकरणावर परिणाम झाला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here