वाचा:
नेते सुब्रमण्यम स्वामी यांना आपलं ट्वीट डीलीट करावं लागलं आणि केंद्रीय मंत्री यांनाही आपले वक्तव्य काही तासांतच मागे घ्यावं लागलं. त्यावर बोट ठेवत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेतृत्वावर प्रहार केला आहे. ‘ज्याप्रमाणे गुजरातला १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली तशीच आर्थिक मदत वादळाचा तडाखा बसलेल्या अन्य राज्यांना विशेषतः महाराष्ट्राला दिली गेली पाहिजे’, अशा आशयाचे ट्वीट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं होतं. पण काही तासानंतर त्यांनी ते ट्विट डीलीट केलं. याआधी नितीन गडकरी यांनीही याप्रकारे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले गेले. ट्वीट डीलीट होते आहे. नेते बोलल्यानंतर शब्द मागे घेतायत म्हणजे स्वत:ची मते मांडण्याचा अधिकार भाजप पक्षात नाही, हे यातून सिद्ध झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
वाचा:
मलिक यांची आरोपांची मालिका…
नवाब मलिक यांनी भाजप नेतृत्वावर आरोपांची मालिकाच लावली आहे. त्यांनी पंतप्रधान यांच्यावरही टीका केली. करोनाने देशात लाखो लोकांनी जीव गमावले. यामुळे मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण होत आहे. अशातच व्हिसी दरम्यान पंतप्रधान मोदी भावुक झाले. पण ते खरंच भावुक झाले की हे चित्र निर्माण करण्यात आले, याबाबत आता लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोदी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिसीद्वारे चर्चा करताना नेहमीच उपरणे व मास्क वापरतात. मात्र त्यादिवशी त्यांनी उपरणे व मास्क दोन्ही वापरले नाही. याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा आरोपही मलिक यांनी केला. मोदींचे इंडियन मॉडेल झाले पाहिजे पण नदीत मृतदेह प्रवाहित करणं, ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावणे, औषधांचा तुटवडा, देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे असे मॉडेल कोणीही स्वीकारणार नाही, अशी टीकाही मलिक यांनी केली होती.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times