करोनाच्या जीवघेण्या संसर्गाची दुसरी लाट आली तेव्हाच हा नियम लागू करण्याची गरज होती. आता पुण्यामध्ये रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे या नियमाची आवश्यकता नाही. तर एकीकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना रुग्णांसाठी कोविड सेंटर्स कमी पडतील. यात आणखी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
खरंतर, याआधीही मुरलीधर मोहोळ यांनी लॉकडाऊन कडक करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. सुप्रीम कोर्टामध्ये दाखवण्यात आलेले करोना रुग्णांचे आकडे आणि पालिकेने दिलेले आकडे यामध्ये तफावत आहे. पुण्यात करोनाचा धोका कमी होत असताना कडक लॉकडाऊनची गरज नाही असंही यावेळी त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, ‘रेड झोनमध्ये असलेल्या ज्या १८ जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे त्या जिल्ह्यांना दोन सूचना देण्यात आल्या आहेत. एक म्हणजे होम आयसोलेशन बंद करा आणि कोविड केअर सेंटर वाढवा, व दुसरी कोविड केअर सेंटर वाढवून सगळ्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आयसोलेट करण्यात येणार आहे. १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा करोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
तसंच, राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के इतका आहे तर, पॉझिटिव्हीटी रेटदेखील कमी होत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड अॅण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुमारे ७० हजाराच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times