भारताच्या १३० कोटी जनतेपैकी ११ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस आणि फक्त ३ टक्के नागरिकांना दोन डोस मिळाले आहेत. मोदीजींच्या ‘टीका उत्सव’च्या घोषणेनंतर गेल्या एक महिन्यात लसीकरणात ८३ टक्के घट झाली आहे. मोदी सरकारने आज देशाला लसीच्या तुटवड्याच्या दलदलीत ढकललं आहे. लसीच्या तुटवड्यामागे सरकारचे लसीकरण धोरणातील अपयश समोर आले आहे. याला जबाबदार कोण आहे? असा सवाल प्रियांका गांधींनी केला.
करोना संसर्गाच्या सुरवातीला भारतात सामान्यांचे जीव वाचवण्यासाठी लसीचा शस्त्र म्हणून उपयोग करण्याऐवजी त्याचा वैयक्तीक प्रचारासाठी वापर केला गेला. यामुळे देशातील लसींचा सर्वात मोठा उत्पादक असलेला देश हा इतर देशांच्या लसींच्या दानावर अवलंबून आहे. लसीकरणाच्या स्तरावर जागातील कमकुवत देशांच्या यादी भारताचा समावेश झाला आहे. हेच आजचे कटू सत्य आहे. असं का झालं?, असं प्रियांका गांधींनी विचारलं.
प्रियांका गांधींचे प्रश्न…
– सरकारने गेल्या १ वर्षांपासून लसीकरणाचे नियोजन केले होते. मग जानेवारी २०२१ मध्ये १ कोटी ६० लाख लसींच्या डोसची ऑर्डर का दिली गेली?
– सरकारने नागरिकांना कमी लस देऊन, लसीचे अधिक डोस हे विदेशात का पाठवले?
– भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. पण आज दुसऱ्यांच्या देशांकडून लस मागण्याची वेळ का आली? आणि तेही मोठी कामगिरी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न का केला जात आहे?
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times