नागपूर: राज्य सरकारने आज चंद्रपूर जिल्ह्यातील उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधी पक्ष टीका करू लागले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी सरकारच्या या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ( said that the decision to lift the in chandrapur is unfortunate)

राज्य मंत्रिमंडळाने चंद्रपुरातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. आता लवकरच याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात येईल, अशी माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
‘२०१५ साली एका समितीच्या अहवालानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयानंतर उलट परिणाम दिसू लागले होते. त्यानुसार जिल्हाभरात अवैध दारुविक्रीचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याचे चित्र आहे. विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीकडे सुमारे अडीच लाख लोकांनी दारुबंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर या समितीने दारुबंदी उठवण्याची शिफारस केली. या शिफारशीनंतरच राज्य सरकारने दारुबंदी उठवण्याचा निर्णय का घेतला, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here