जळगाव: जिल्ह्यात संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्याचा घटून ३.८४ टक्क्यांवर आला आहे. सर्वात कमी पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जळगाव जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे. ( )

वाचा:

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानतंर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.८९ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मागील १५ दिवसांत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांनी घसरला आहे. सध्या पॉझिटीव्हिटी रेट ३.८३ टक्क्यांवर आला आहे. राज्यात सर्वात कमी पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी जिल्हा असून भंडाऱ्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.४४ टक्के इतका आहे. आरोग्य विभागातर्फे बुधवारी १८ ते २४ मे या आठवडाभराच्या कालावधीतील पॉझिटिव्हिटी रेटची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यातून ही माहिती मिळाली.

वाचा:

तिसऱ्या लाटेसाठी सज्जता

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका राहील, अशी शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. त्यात शासकीय आरोग्य यंत्रणेतील तज्ञ डॉक्टरांसह खासगी डॉक्टर्स यांचाही समावेश आहे. बालरोगतज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ यांचा प्राधान्याने टास्क फोर्समध्ये समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here