नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पश्चिम बंगासह ओडिशाचा दौरा ( ) केला. यास चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची हवाई पाहणी पंतप्रधान मोदींनी केली. यानंतर ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल, मुख्यमंत्री नवीन पटनायक ( ), केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रताप सारंगी यांनी बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यास चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये मोठे नुकसान झाले आहे. तरीही मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केंद्र सरकारकडे कुठल्याही तातडीच्या पॅकेजची मागणी न करत देशवासियांचे मन जिंकले.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दोन ट्वीट केले. देश करोना संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थिती तातडीची आर्थिक मदत मागून आम्हाला केंद्र सरकावर कुठलाही बोजा टाकायचा नाहीए. आम्ही आपल्या संसाधनांच्या माध्यमातून या संकटातही व्यवस्था करू, असं पटनायक म्हणाले.

पंतप्रधान मोदींसोबतच्या आढावा बैठकीनंतर स्टेट रिलीफ कमिश्नर प्रदीप जेना यांनीही हीच माहिती दिली. आम्ही आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींकडे कुठल्याही आर्थिक मदतीची किंवा पॅकेजची मागणी केली नाही. पण राज्यासाठी शक्तीशाली आपत्ती निवारण यंत्रणा आणि किनारपट्टीच्या भागांची वादळापासून सुरक्षा, या दोन मागण्या आम्ही केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यास चक्रीवादळामुळे ४ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २१ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं.

ओडिशाने कुठल्याही आर्थिक पॅकेजची मागणी केली नसली तरी पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारकडून ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. यासह पश्चिम बंगाल आणि झारखंडला मिळून ५०० कोटींची मदत जाहीर केली. तसंच मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि गंभीर जखमींना ५० हजारांची मदतही जाहीर केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here