वाचा:
राज्य सरकारने परीक्षा घ्याव्यात, या उद्देशाने धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या घटनेचा राग मनात धरून दोन व्यक्तींनी फेसबुकच्या माध्यमातून कुलकर्णी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याचप्रमाणे संसर्गाच्या काळात परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल, अशी मला धमकी देण्यात आली असे कुलकर्णी यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, काही विद्यार्थी आणि पालक सोशल मीडियावर; तसेच कॉल किंवा मेसेज पाठवून धमकावत आहेत. त्याचप्रमाणे काही व्यक्तींकडून थेट ‘पुण्यात राहायचे नाही का ?’ अशा पद्धतीने धमकी मिळाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
वाचा:
दरम्यान, धनंजय कुलकर्णी यांनी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलेले आहे. याप्रकरणी सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. असे असतानाच शिक्षण विभागाने दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करताना त्याचे नियम व निकषही ठरवले आहेत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन निकषांच्या आधारे गुण दिले जाणार असून अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयावरही कुलकर्णी यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामध्ये नेमकेपणाचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना आणखी गोंधळात टाकण्याचे काम सरकारने केले आहे, असे नमूद करत कुलकर्णी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. असे सर्व सुरू असताना कुलकर्णी यांना धमकी दिली गेल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times