औरंगाबाद : औरंगाबादमध्ये चिमुकलीच्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज इथल्या शिवाजीनगर इथे एका इमारतीमधील उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून साडेतीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, रविवार ३० मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गौरी वैभव बगाडे असं मृत मुलीचं नाव असून ती तिच्या चुलत आजोबा यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी वडिलांसोबत आली होती. यावेळी सगळे विधीमध्ये व्यस्त असताना गौरीसोबत असा भयंकर प्रकार घडला.

या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. घटना घडताच तात्काळ मुलीला बाहेर काढून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाळूज पोलिसांनी घटनास्थळावरून गौरीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here