शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळं शिवाजी पार्क नुतनीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नुतनीकरणाच्या कामासाठी ३५ विहिरी खोदण्यात आल्या होत्या. त्यात पाच विहिरींमध्ये गोडे पाणी लागले आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी या गोड्या पाण्याच्या विहिरींचा शोध लावला आहे.
वाचाः
दादार- शिवाजी पार्क भागात समुद्र अवघ्या काही अंतरावर असला तरीही या भागात अनेक जुन्या विहीरी होत्या. कालांतराने त्या बुजवण्यात आल्या. महिमपासून- वरळीपर्यंत आणि समुद्रापासून सावरकर मार्गापर्यंत वालुकामय भाग आहे. त्यामुळं इथे गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत, अशी माहिती भूगर्भशास्त्र्यांनी दिली आहे. तसंच, वालुकामय भाग असल्यानं इथं विहीरी लागणार याची खात्री होती, असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः
शिवाजी पार्क मैदानाच्या नुतनीकरणाचं काम सुरु झाल्यानंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी प्लॅटिनम रॉडच्या सहाय्याने या गोड्या पाण्याच्या विहिरींचा शोध लावला आहे. तसंच, आजच्या घडीला प्रत्येक विहिरीत १. ५० लाख लिटर पाणी आहे. व शिवाजी पार्क परिसराची पाण्याची गरज ३ लाख आहे. त्यामुळं दिवसाआड या पाण्याचा वापर केला तर या विहिरीतील पाण्याची पातळी खाली जाणार नाही, असं भूगर्भशास्त्रज्ञ यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times