पुणे: राज्यात मध्ये शिथीलता देण्याचं सूत्र साधारण ठरलेलं आहे. जिथे ५ टक्क्यांच्या खाली आहे तिथे निर्बंध शिथील केले जाणार आहेत. जिथे १० टक्क्यांच्या खाली हा दर आहे तिथे निर्बंध काही प्रमाणात शिथील केले जाणार आहेत आणि १० च्या पुढे जिथे पॉझिटिव्हिटी दर आहे तिथे पहिल्यासारखे निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. याबाबतचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच निर्णय अंतिम राहणार आहे, असे उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. आणि पिंपरी चिंचवड शहरांमधील रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी झाले असल्याने दोन्ही शहरांमध्ये निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय येत्या सोमवारी (सहा जून) घेतला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ( )

वाचा:

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. निर्बंध शिथील करताना दुकाने पूर्णवेळ सुरू करायची की नाहीत, याबाबतचा निर्णय दोन दिवसांतील परिस्थितीचा आढावा घेऊन घेण्यात येणार आहे. पुणे आणि खडकी कँन्टोन्मेंट बोर्ड यांचा समावेश जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असला, तरी या परिसरातीलही निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. मात्र, जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील निर्बंध कायम ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाचा:

अजित पवार म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण हे पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी निर्बंध शिथील केले जाणार आहेत. येत्या सोमवारी याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अंदाजे १३ टक्के असल्याने या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत. पुणे आणि खडकी कँटोन्मेंट बोर्ड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दाखविण्यात येतात. मात्र, या ठिकाणी पॉझिटिव्हिटीचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या दोन्ही परिसरातील निर्बंध शिथिल होणार आहेत. मात्र, देहूरोड कँटोन्मेंटमध्ये शिथिलता दिली जाणार नाही’

आढावा घेऊन निर्णय

‘निर्बंधांमध्ये कोणत्या प्रकारची शिथिलता द्यायची, याबाबत येत्या दोन दिवसांतील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय होणार आहे. ब्युटीपार्लर आणि सलून सुरू करण्याची मागणी आहे. अन्य दुकानेही सुरू करण्याबाबत मागणी केली जात आहे. हॉटेल सुरू करायची की नाहीत, याबाबत सोमवारी अंतिम निर्णय होणार आहे,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

वारीबाबतचा निर्णय समिती घेणार

‘आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीला परवानगी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांचा समावेश आहे. ५० लोकांच्या उपस्थितीत वारीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी आहे. कुंभमेळ्याचा अनुभव पाहता वारीला परवानगी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय समितीकडून घेतला जाणार आहे,’ असे पवार यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here