उद्धव-राज एकत्र येणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर आकाशाकडे बोट दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं राज यांनी म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांचाही प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच भाष्य करू शकतील, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं.
खासदार संजय राऊत यांना आज याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी राज ठाकरे यांना टोला हाणला. ‘परमेश्वर हा कुठल्याही राजकीय पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळं अशा गोष्टी परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो, त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी एक प्रकारे राज यांना स्वत:हून पुढाकार घेण्यास सुचवल्याचं बोललं जात आहे.
वाचा:
राज्यात सध्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या आघाडीचं सरकार आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. तर, मुंबई महापालिकेतून शिवसेनेला हद्दपार करण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. त्यासाठी मनसेची मदत घेण्याचेही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेच्या मदतीनं मराठी मते खेचून शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्लान आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला अधिक महत्त्व आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times