मुंबई शहरात करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आला असला तरी मुंबई तूर्त लेव्हल ३ मध्येच राहणार आहे.
कोणत्या कारणांमुळे निर्बंध शिथिल होणार नाहीत?
मुंबई शहरातील करोना निर्बंध शिथिल करण्याचे सर्व मार्ग खुले झाले असले तरीही आधीचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. या निर्णयामागे शहरातील लोकसंख्या हे मुख्य कारण असून या निर्णयामागे इतरही काही कारणे आहेत.
.
१. शहरातील दाट लोकसंख्या
२. लोकलमध्ये होणारी गर्दी
३. हवामान विभागाकडून देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान, महानगरपालिकेच्या या आदेशामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली होईल, अशी आशा बाळगणाऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. नवा आदेश येईपर्यंत आधीचे नियम कायम राहतील, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई शहरात इतर निर्बंध नेमके कधी खुले होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times