योग्य नालेसफाई न झाल्याने कमानी परिसरात पाणी साचत होतं. नागरिक याबाबत तक्रार करत होते, असे लांडे म्हणाले. कंत्राटदाराला बोलावलं पण तो दोन तास झाले तरी आला नाही. त्यामुळे त्याला शिवसैनिकांनी शोधून नाल्याजवळ आणला आणि रस्त्यावरील कचऱ्यात व घाणेरड्या पाण्यात बसवलं. त्याच्या अंगावर शिवसैनिकांनी कचरा देखील ओतला, अशी माहिती लांडे यांनी दिली आहे.
या भागातील आमदार म्हणून परिसर स्वच्छ राहावा ही माझी जबाबदारी आहे. तसंच नालेसफाईचं काम घेतलेल्या कंत्राटदाराचीही जबाबदारी आहे. कंत्राटदार आपलं काम करत नसल्यानं त्याला धडा शिकवला असं लांडे म्हणाले.
दरम्यान, भाजपने या प्रकरणी जोरदार टीका केली आहे. पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना सेनेचे आमदार, नगरसेवक काय करत आहेत याकडे बघा. लांडे यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांना अशी वागणूक देण्याची हिंमत दाखवावी, असे भाजपचे पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी ट्वीट केल आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times