मुंबई:अभिनेता यांच्या मृत्यू प्रकरणावरून भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडी सरकारला घेरलं होतं. ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. सरकारमधील एका मंत्र्यावरही आरोप झाले होते. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींचीही साथ भाजपला मिळाली होती. कालांतरानं हे प्रकरण सीबीआयकडं गेलं. मात्र, सुशांतच्या आत्महत्येला वर्ष उलटल्यानंतरही सीबीआय अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत आलेली नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप व सीबीआयवर निशाणा साधला आहे.

वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती. म्हणूनच सीबीआयला पुढं करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं कटकारस्थान रचण्यात आलं होतं, असा थेट आरोप मलिक यांनी केला आहे.

वाचा:

‘सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळं या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारनं दाखल केला व ही केस सीबीआयकडे दिली होती. परंतु, निष्पन्न काय झालं? एक वर्ष उलटूनही सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास पूर्ण झालेला नाही. सुशांतनं आत्महत्या केली नव्हती असं म्हटलं जात असेल तर मग त्याचा खुनी कोण हे सीबीआयनं जनतेला सांगितलं पाहिजे,’ अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here