मुंबई: जनता सध्या सरकारला कंटाळलेली असून जनमत विचाराकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. देशात काँग्रेस हाच भाजपला पर्याय असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बूथ स्तरावर काम करा आणि गावखेड्यात काँग्रेसचा विचार पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी केले आहे. ( )

वाचा:

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गांधी भवन येथे पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पटोले संघटन भक्कम करण्यासाठी आवाहन केले. काँग्रेस विचाराचे सरकार येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने काम केले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष असून जळगाव जिल्हा व उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस संघटना मजबूत करून पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी काम करा, असे आवाहन यावेळी पटोले यांनी केले.

वाचा:

या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री , माजी मुख्यमंत्री आमदार , महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार शिरीष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेसने स्वबळावर लढले पाहिजे यासाठी नाना पटोले आग्रही आहेत. राज्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढता याव्यात म्हणून त्यांनी पक्ष संघटन भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत. पटोले यांची गेल्या काही दिवसांतील विधाने चांगलीच चर्चेत आहेत. त्यात पक्षातूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यातही ते यशस्वी ठरत आहेत. पटोलेंचा हा आक्रमक बाणा राज्यात काँग्रेसची गाडी रूळावर आणणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here