मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री यांनी नुकतीच शाहू महाराजांची भेट घेतली होती. त्यात आरक्षणाच्या प्रश्नावरही चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर शाहू महाराज काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. शाहू महाराजांनी यावेळी अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. ‘मराठा समाजाच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता जे जे शक्य आहे, योग्य आहे, ते राज्य सरकारनं लवकरात लवकर द्यावं,’ असं ते म्हणाले.
‘राज्यानं आता एकमुखानं लढा द्यायला हवा. हा आवाज आंदोलनाच्या निमित्तानं मुंबईपर्यंत पोहोचला आहेच, आता दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा. राज्य सरकार आपल्या सोबत आहे यात जराही शंका नाही. त्यामुळं आता केंद्र सरकारनं हा विषय मनावर घेतला तर आरक्षणाचा प्रश्न लवकर सुटेल. पंतप्रधानांच्या मनात काय आहे हे कळायला हवं,’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. ‘कुठलाही एक माणूस ही लढाई लढू शकणार नाही, त्यामुळं संभाजीराजांना आता सर्वांनी ताकद द्यावी,’ असं आवाहनही त्यांनी केलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times