इस्लामाबाद: पाकिस्तानमधील राजकीय नेते भारताविरोधी वक्तव्ये देत असताना आता कोर्टाकडूनही भारतविरोधी शेरेबाजी होऊ लागली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अतहर मिनल्लाह यांनी एका प्रकरणाची सुनावणी करताना भारताला कमी लेखले.

पाकिस्तानच्या हायकोर्टात पश्तून तहफूज आंदोलन (पीटीएम) आणि अवामी वर्कर्स पार्टी (एडब्लूपी) या पक्षाच्या २३ कार्यकर्त्यांच्या जामिनावर सुनावणी करत होते. पीएटीएम पक्षप्रमुख मंजूर पश्तीन यांच्या अटकेविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात इस्लामाबाद पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली होती. कार्यकर्त्यांवर देशद्रोहाशी आणि दहशतवादी कारवाईशी संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणाची सुनावणी इस्लामाबाद हायकोर्टात झाली. त्यावेळी कोर्टाने पोलिसांची कानउघडणी केली. लोकशाहीत निवडून आलेल्या सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी अपेक्षित नाही. सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करावी अशी कोर्टाला अपेक्षा नाही. इथे सर्वांच्या संविधानिक अधिकाराचे रक्षण केले जाईल. कारण हा देश भारत नसून पाकिस्तान असल्याचे मुख्य न्यायाधीशांनी म्हटले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे मागे घेत असल्याचे कोर्टात सांगितले. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाने हे प्रकरण संपुष्टात आले आहे.

पाकिस्तानमधील कोर्टात भारतविरोधी झालेल्या शेरेबाजीवर भारताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मागील काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्कवाढीविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळीही काही विद्यार्थी नेत्यांना अटक करण्यात आली होती. तर, काहींना अज्ञात स्थळी नेण्यात आले होते.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here