शांती नगर भागात एकाकी राहणााऱ्या महिलेच्या झोपडीवर मतानी यांनी आपल्या स्वखर्चातून ताडपत्री टाकत तिच्या गळणाऱ्या झोपडीला आधार दिला आहे. पावसाळ्यात या महिलेच्या झोपडीतून पाणी गळतं होतं. घरात पाणी शिरल्यामुळं तिथं राहणं मुश्किल झालं होतं. या वयात असं गळक्या घरात राहिल्यामुळं आजारी पडण्याचीही भीती होती. गळणाऱ्या झोपडीमुळं तिचं जगणं मुश्किल झाल होतं.
वाचाः
परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त मतानी हे शहरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करीत होते. शांती नगरात आपल्या ताफ्यासह पायी पेट्रोलिंग करत असताना ते व त्यांचे सहकारी एका झोपडीजवळ थांबले. पाऊस सुरू असल्याने त्यांनी आत डोकावून पाहिलं तर नर्मदा बबन बावनकुळे या ७० वर्षीय आजी त्यांना आत भिजताना दिसल्या. त्यांनी सहज चौकशी केली तर घरात मी एकटीच राहते. ४० वर्षांपूर्वी पतीचे निधन झालं, दोन मुलंही मरण पावली असं या महिलेनं सांगितलं.
नर्मदा यांची कहाणी ऐकून मतानी यांनी लगेच सोबत असलेल्या आपल्या सहकारी पोलिस मित्रांना ताडपत्री आणण्यास सांगितलं. तसंच, त्यांनी स्वखर्चानं व ताडपत्रीची व्यवस्था केली. एवढ्यावरच मतानी थांबले नाहीत तर त्यांनी स्वतः ताडपत्री तिच्या झोपडीवर टाकून दिली. करोनाच्या संकट आणि मुसळधार पाऊस कोसळत असताना मदतीसाठी धावून आलेल्या पोलिसांमुळं नर्मदा यांच्या डोळ्यात अश्रु तरळले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times