सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाचा धोका असताना राजकीय घडामोडींना मात्र वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकांवरून खडाजंगी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अशात सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या भाजप नेत्या चिञा वाघ यांनी कुडाळ येथील एमआयडीसी शासकीय विश्रामगृहावर राज्याचे उच्च आणि तंञशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली हे देखील उपस्थित होते. भाजप आणि शिवसेनेमधील वाद राज्याला आता काही नवीन नाही. त्यामुळे अशा दोन्ही पक्षीय नेत्यांच्या भेटी झाल्या की राजकीय चर्चांना उघाण येतं. आशात ही भेट नेमकी कोणत्या विषयावर झाली आणि यामध्ये काय चर्चा झाली याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

दरम्यान, या भेटीनंतर भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला असता दोघांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य दिलं. त्यामुळे यागचा नेमका अर्थ काय ? असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. इतकंच नाहीतर, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगत ही राजकीय संकृतीचं दर्शन असल्याचं म्हणत प्रत्येक भेटीला संकेतामधे बदलण्याची गरज नाही असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here